Tuesday, April 16, 2024
Homeकृषीआकोट तालूक्याच्या ९१ गावातील १२ हजार शेतकऱ्यांच्या ८८७८ हेक्टर शेतपिकाचे ६ करोडचे...

आकोट तालूक्याच्या ९१ गावातील १२ हजार शेतकऱ्यांच्या ८८७८ हेक्टर शेतपिकाचे ६ करोडचे नुकसान…चोहोट्टा, कुटासा मंडळांमध्ये सर्वाधिक क्षती.

Share

संजय आठवले, आकोट

आकोट महसूल विभागाने तालूक्यात माहे जुलैमध्ये झालेल्या शेतीविषयक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार तालूक्याच्या ९१ गावातील १२ हजाराचे वर शेतक-यांची ८८७८.१२ हेक्टर शेती पावसाने बाधीत झाली असुन चोहोट्टा व कुटासा या दोन मंडळांना नुकसानीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कपाशीचे सर्वाधिक तर त्या खालोखाल सोयाबिन व मूग ही पिके क्षतिग्रस्त झाली आहेत. या अहवालात संपूर्ण तालूक्यात ५ कोटी ७५ लक्ष ४३ हजार ८०३ रुपयांचे नुकसान दर्शविण्यात आले असून त्यामध्ये चोहोट्टा व कुटासा मंडळातील ८६०० शेतक-यांच्या ७१९० हेक्टर क्षेत्रात ४ कोटी ६० लक्ष १८ हजार ५६० रुपयांचे नुकसान झाले आहे.

माहे जुलैमध्ये आकोट तालूक्यात पावसाचे सातत्य राहील्याने शेतपिकाना मोठी हानी पोचली. त्या संदर्भात महसुल व कृषी विभागाने आकोट तालूक्यात संयुक्त पाहणी करुन शेतीविषयक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार तालूक्यातील आकोट, आकोलखेड व आसेगाव ह्या तिन महसूल मंडळात नुकसानीचे प्रमाण निरंक राहिले आहे. ऊर्वरित मंडळांमध्ये ८० गावातील ११ हजार ९९८ जिरायत शेतधारकांच्या ८७७६.७२ हेक्टर क्षेत्रात ५ कोटी ६१ लक्ष ७१ हजार ००८ रुपयांचे, ९ गावातील १२७ बागाईत शेतधारकांच्या १००.३ हेक्टर क्षेत्रात १३ लक्ष ५४ हजार ०५० रुपयांचे तर एका गावातील एका फळबागधारकाचे ०.६ हेक्टर क्षेत्रात ० रुपयांचे तर एका गावातील एका शेतक-याचे ०.५ हेक्टर शेतक्षेत्र खरवडून गेल्याने १८ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये ६६४६.७६ हेक्टरवरील कपाशी नष्ट झाली असुन त्या पाठोपाठ ७६२.६ हेक्टर सोयाबिन व ७५८.८ हेक्टर मूग बाधीत झाला आहे. तर ६०७.६५ हेक्टर ज्वारी, तूर व ईतर पिकाना फटका बसला आहे. या नुकसानीत अव्वल असलेल्या चोहोट्टा मंडळाच्या २५ गावातील ४८०० शेतक-यांच्या ३३५० हेक्टर क्षेत्रातील २२८१ हेक्टर कपाशी तर १०६९ हेक्टर सोयाबिन, ज्वारी, तुर व मूग क्षतिग्रस्त झाले आहेत. तर नुकसानीत दुस-या क्रमांकावरिल कुटासा मंडळाच्या १९ गावातील ३८०० शेतक-यांच्या ३८४०.४ हेक्टर क्षेत्रातील ३५१९.६ हेक्टर कपाशी व २५१५ हेक्टर सोयाबिन, ज्वारी व मूग या पिकाना फटका बसला आहे.

या नैसर्गिक आपत्तीने चोहोट्टा मंडळात २ कोटी १४ लक्ष ४० हजाराचे तर कुटासा मंडळात २ कोटी ४५ लक्ष ७८ हजार ५६० रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला असून बाधीत शेतक-याना नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: