संजय आठवले, आकोट
राज्यात नगर परिषद निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आकोट पालीका निवडणूक एकजूटीने जिंकण्याचा निर्धार काँग्रेसजनानी स्थानिक शासकिय विश्रामगृह ईथे पार पडलेल्या अनौपचारीक बैठकीत व्यक्त केला आहे. या बैठकीमूळे काँग्रेस ऍक्शन मोडवर आल्याने आपसातील गटतट सोडून विजय खेचून आणण्यावर सर्व गटांचे एकमत झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील पालीका निवडणूकीचा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच शहरात सर्वच राजकिय पक्षांमधील हलचल सुरु झाली होती. परंतू अध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यायची घोषणा झाल्याने लगेच नव्या षामिकरणाना सुरुवात झाली. परंतु काँग्रेस पक्ष मात्र तीन गटात केंद्रीत झाल्याने प्रत्येक गट आपल्या ताकापूरतं रामायण करण्यातच मश्गूल होता. त्यावर काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यानी पुढाकार घेवून सर्व गटांच्या एकत्रिकरणाची योजना आखून स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे एक अनौपचारीक बैठक आयोजित केली.
या बैठकीत अनेक मुद्यांवर खल करण्यात आला. प्रामुख्याने आज घडीला काँग्रेसजवळ काही नाही. मग गटतट कशाकरिता? पक्ष राहील तर आपण राहू. त्यासाठी गटतटात न पडता सर्वानी एकदिलाने पालीकेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयास करावेत ह्या मुद्द्यांवर सा-यांचे एकमत झाले. त्यासाठी गणगणे गटाचे महेश गणगणे, बोडखे गटाचे संजय बोडखे आणि म. बद्रुज्जमा यानी काहीही झाले तरी ही निवडणूक जिंकायचीच हा निर्धार केला. ह्या अनौपचारीक बैठकीनंतर औपचिरीक बैठका घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला ऍड. महेश गणगणे, प्रा. संजय बोडखे, म. बद्रुज्जमा, डॉ. प्रमोद चोरे, सतिश हाडोळे, रतन गुजर, दिपक वर्मा, संजय आठवले, ऍड. मनोज खंडारे. ऍड. अतुल सोनखासकर, सुनिल गावंडे, बाळासाहेब ईंगळे, नागेश ईंगळे, म. आरीफ, अजहर शेख, कदीर शा, अ. मुबारक, प्रतिक गोरे, प्रकाश मंगवाणी, मयुर निमकर, म. सलीम, शे. ख्वाजा, सारंग मालाणी, आनंद अग्रवाल, अ, निसार, नुसरत अली, म. सगीर, हफीजखान, विलास घाटोळ, शिवदास सावरकर, संतोष नाथे, अरुण अंबळकार आदी असंख्य गणमान्य ऊपस्थित होते.