Saturday, April 20, 2024
HomeMarathi News Todayबंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या 'या' ट्वीटने उडाली शिंदे गटाची झोप...नंतर केली...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या ‘या’ ट्वीटने उडाली शिंदे गटाची झोप…नंतर केली सावरासावर…

Share

राज्यात शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर मुंबईत आपले शक्तीप्रदर्शन करणारे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या एका ट्वीट ने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. परंतु यावर स्वतः संजय शिरसाट यांनी केलेल्या Twit संदर्भात सावरासावर केली. काय ट्वीट केले होते ते आपण जाणून घेवूया.

आपल्या ट्विटमध्ये शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील कुटुंबप्रमुख असे वर्णन केले आहे. या ट्विटची वादळी चर्चा सुरू होताच शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. शिरसाट यांनी आपल्या ट्विटसोबत उद्धव ठाकरे यांचे विधानसभेतील भाषणही जोडले आहे. पण, काही वेळाने त्यांनी हे ट्विटही डिलीट केले. मात्र, शिंदे गटातील आपण सर्वजण खूप आनंदी असल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण ट्विट करून शिंदे गटाला इशारा दिला आहे की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना आमदार म्हणाले, मी जे ट्विट केले ते उद्धव ठाकरे यांचे विधानसभेतील भाषण होते. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राबाबत मत मांडले होते, की उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच आजही माझे मत आहे की, तुम्ही कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत असाल तर कुठेतरी कुटुंबातील सदस्यांचे मत विचारात घेतले पाहिजे.” एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतापेक्षा तुमच्या कुटुंबाच्या मताचा आदर करा, असे माझे ट्विट चा अर्थ होता.” मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे आणि त्यांची कोणतीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी नाराज नाही, माझी भूमिका आजही कायम आहे
ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आम्ही कुटुंबप्रमुख मानत होतो, पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे सद्यस्थितीबद्दल आम्हाला खेदही वाटतो. मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी हे ट्विट केले नाही. मी तत्त्वाचा माणूस आहे. शिंदे गटासह माझ्या प्रवासात मी नेहमीच बोललो आहे. मला जे योग्य वाटते तेच मी बोलतो. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नये, असंही माझं मत होतं. मी अजूनही त्यावर ठाम आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत.”


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: