Friday, April 26, 2024
Homeगुन्हेगारीगुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू…३० जणांची प्रकृती गंभीर…

गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू…३० जणांची प्रकृती गंभीर…

Share

गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात दारूबंदी असतानाही या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण रुग्णालयात दाखल आहेत. दुसरीकडे भूपेंद्र पटेल सरकार सतत लक्ष ठेवून आहे. सोमवारी सीएम पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.

गुजरात पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी रात्री सांगितले की, काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा देखील तपासात सामील झाले आहेत.

काहींची प्रकृती अजूनही गंभीर
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 30 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश जण भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तत्पूर्वी, उपचार घेत असलेल्या पीडितेच्या पत्नीने सांगितले की, रविवारी रात्री रोजीद गावात दारू प्यायल्यानंतर काही तासांतच तिच्या पतीची प्रकृती बिघडली. त्याच वेळी, आणखी एक पीडित हिम्मतभाई, जो आता बरा झाला आहे, असा दावा केला आहे की हे लोक रविवारी रात्री एका तस्कराकडून विकत घेतलेली दारू पिल्याने आजारी पडले.

पोलिस महानिरीक्षक (भावनगर परिक्षेत्र), अशोक कुमार यादव यांनी सायंकाळी बोताड सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीएम पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली
दरम्यान, या दुर्घटनेचे वृत्त गांधीनगरमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोटाडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केजरीवाल यांनी हल्लाबोल केला
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातमधील विषारी दारूच्या दुर्घटनेला “दुर्दैवी” म्हटले आणि राज्यात दारू विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप केला. राज्यात दारू विक्रीवर बंदी आहे. केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये दारूबंदीनंतरही मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकली जाते हे दुर्दैवी आहे. दारू विकणारे हे कोण आहेत? त्यांना राजकीय आश्रय मिळतो. (दारू विक्रीतून) पैसा जातो कुठे? त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: