Friday, April 26, 2024
Homeराजकीयकोकणच्या शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित व खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती होण्याची सार्वजनिक मंत्री...

कोकणच्या शाश्वत पर्यटन वाढीसाठी सुरक्षित व खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती होण्याची सार्वजनिक मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे महासंघाची मागणी…

Share

कोकण – किरण बाथम

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदी कोकण चे सुपुत्र मा. रविंद्रजी चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या व टी टी डी एस च्या पदाधिकांऱ्यानि मंत्री महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोंऱ्यावर असताना सदिच्छा भेट घेतली.

यावेळी कोकणात पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामीण व शहरी पर्यटन स्थळावर पोचण्यासाठी खड्डेमुक्त व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती होण्यासंबंधी कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात आली.मागील सरकारच्या काळात बंदर विकास मंत्री म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कोकणात नव्याने बंदरजेटींची निर्मिती करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी नव्याने उभारण्यात आलेली जेटी अश्या प्रकारच्या अनेक जेटीमुळे कोकणात सुरक्षित जलपर्यटन होण्यास मदत झाली आहे.

कोकणातील मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्या मुळे बहुचर्चित मुंबई गोवा महामार्ग तसेच पर्यटन वाढीसाठी आवश्यक रस्त्यांचे जाळे कोकणात निर्माण होईल, तसेच सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.अशी माहिती महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.

यावेळी महासंघ मालवण तालुका अध्यक्ष अवि सामंत.मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर .मालवण वाहतूक आघाडी तालुका अध्यक्ष किसन मांजरेकर,टी.टी डी.एस अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर , दर्शन वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: